कृषि विभाग
परिचय
भारत हा कृषिप्रधान देश असून कृषी हा अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ मानला जातो. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 18.5 टक्के आहे. वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता कृषी उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, औजारे व पीक संरक्षण औषधे शेतकऱ्यांना माफक दरात आणि योग्य वेळी उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्यात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या तत्त्वानुसार कृषी विभाग, जिल्हा परिषद लातूर कार्यरत आहे.
लातूर जिल्ह्यात एकूण 10 तालुके असून जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 7.15 लाख हेक्टर आहे. त्यापैकी 6.65 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 734.55 मि.मी. आहे. कृषी विकास अधिकारी हे विभागाचे प्रमुख आहेत. राज्य पुरस्कृत, केंद्र पुरस्कृत आणि जिल्हा परिषद निधीतून विविध कृषी विकास योजना प्रभावीपणे राबविल्या जातात.
दृष्टी आणि ध्येय
दृष्टी
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून ग्रामीण भागाचा समग्र विकास साधणे.
ध्येय
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी साधने, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देऊन स्वयंपूर्ण बनविणे.
उद्दिष्टे व कार्ये
- राज्य, केंद्र आणि जिल्हा स्तरावरील कृषी योजनांची अंमलबजावणी करणे.
- शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, औषधे आणि कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे.
- कृषी निविष्ठांचे गुणवत्ता नियंत्रण करणे.
- नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.
- जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे कामकाज पाहणे.
कृषी योजनांची माहिती
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकरी असावा.
- जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- किमान 0.40 हेक्टर जमीन आवश्यक आहे.
- कमाल जमीन मर्यादा 6.00 हेक्टर आहे.
- 7 12 उतारा आणि 8 अ नोंद आवश्यक आहे.
- आधार लिंक बँक खाते आवश्यक आहे.
- स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सशक्तीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
संपर्क: ग्रामसेवक किंवा कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद लातूर – 02382 259595
राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत योजना 2024 25
- प्रदूषणमुक्त घरगुती इंधन उपलब्ध.
- विद्युत दिव्यासाठी उपयुक्त.
- पर्यावरण संवर्धन आणि रासायनिक खत बचत.
- महिलांच्या आरोग्याचे संरक्षण.
- अनुदान 9800 ते 70400 रुपये उपलब्ध.
- आवश्यक कागदपत्रे 7 12 उतारा आधार पशुधन प्रमाणपत्र बँक पासबुक.
- ऑनलाईन अर्ज biogas.mnre.gov.in
संपर्क: ग्रामसेवक किंवा कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद लातूर – 02382 259595
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
- लाभार्थी अनुसूचित जमातीचा शेतकरी असावा.
- किमान 0.40 हेक्टर आणि कमाल 6.00 हेक्टर जमीन आवश्यक आहे.
- 7 12 उतारा 8 अ नोंद आणि आधार आवश्यक आहे.
- आधार लिंक बँक खाते आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज mahadbt.maharashtra.gov.in
संपर्क: ग्रामसेवक किंवा कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद लातूर – 02382 259595
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: