बंद

    दृष्टी आणि ध्येय

    दृष्टी – 2026

    जिल्हा परिषद लातूरची दृष्टी म्हणजे लातूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवणे, त्यांचे हक्क आणि संधी यांची पूर्तता करणे आणि ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सर्वसमावेशक सहभाग वाढवणे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेळेवर सेवा पुरवण्यावर आमचा भर आहे.

    • ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी तंत्रज्ञान आधारित उपायांची अंमलबजावणी
    • प्रत्येक व्यक्तीपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे
    • सामाजिक समावेश व आर्थिक स्वावलंबन यांना प्रोत्साहन देणे
    • पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन विकासाचे ध्येय

    ध्येय:

    जिल्हा परिषद लातूरचा मुख्य हेतू म्हणजे ग्रामीण भागात समतोल, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास घडवून आणणे. पंचायत स्तरावर कार्यक्षम, पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामस्थाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हे आमचे ध्येय आहे.

    आमच्या कामाचा केंद्रबिंदू:

    • महिला सशक्तीकरण:

      • महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि प्रशिक्षण
      • महिला आरोग्य तपासणी, मातृत्व सेवा व पोषण आहार
      • महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगार योजनांची अंमलबजावणी
      • महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वाची संधी
    • बालकल्याण:

      • अंगणवाडी केंद्रांचा दर्जा सुधारणे
      • पोषण आहार, लसीकरण, प्राथमिक शिक्षणावर भर
      • मुलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती व सहाय्य केंद्रांची उभारणी
      • बालहक्कांचे संरक्षण
    • ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती:

      • आरोग्य तपासणी व मोफत औषधे
      • सन्माननीय जीवनासाठी निवारा व सुविधा केंद्रांची निर्मिती
      • सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी
      • दिव्यांगांसाठी शिक्षण, रोजगार आणि आवश्यक सुविधा
    • शिक्षण आणि आरोग्य:

      • प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दर्जेदार, तंत्रस्नेही व नैतिक शिक्षण
      • जिल्हा परिषदेच्या शाळांचे डिजिटायझेशन
      • प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सशक्तीकरण
      • मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट घडवणे
      • मोबाईल हेल्थ युनिट्स, रक्तदाब/शुगर तपासणीसारख्या सेवा
    • पायाभूत सुविधा विकास:

      • ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण
      • शुद्ध पिण्याचे पाणी घरपोच उपलब्ध करून देणे
      • सौर ऊर्जा व वीज वितरणात सुधारणा
      • गावात स्वच्छता गृह, नाले व कचरानिर्मूलन व्यवस्था
    • शासन आपल्या दारी (ई-गव्हर्नन्स):

      • डिजिटल सेवा पोहोचवणारी ग्रामपंचायती
      • RTPS, ग्रामीण पोर्टल, मोबाइल अ‍ॅप्ससह सेवा सुलभ करणे
      • माहितीचा अधिकार, लोकशाहीचा हक्क, पारदर्शक व्यवहार

    प्रमुख धोरणात्मक उद्दिष्टे:

    • गुणवत्तापूर्ण शिक्षण:

      • डिजिटल क्लासरूम, स्मार्ट लर्निंग सिस्टीम
      • उपयुक्त शैक्षणिक उपक्रम – मिशन शिक्षण, बालक मेळावे
      • गुणवत्तेचे मूल्यांकन व शिक्षक प्रशिक्षण
    • आरोग्य आणि पोषण:

      • “आरोग्य तुम्हा दरवाजा” मोहिम
      • गरोदर माता व बालकांसाठी विशेष लक्ष केंद्रित
      • प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुधारणा
    • महिला, बालक व युवा सक्षमीकरण:

      • महिला व युवकांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम
      • रोजगार हमी, प्रशिक्षण व कौशल्य विकास
      • लैंगिक समानता व संरक्षण उपक्रम
    • शेती व पर्यावरण:

      • सूक्ष्म सिंचन, जलसंधारण, बंधारे बांधणी
      • सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
      • “हरित लातूर” अंतर्गत वृक्षलागवड आणि पर्यावरण रक्षण
    • प्रशासनात पारदर्शकता आणि सहभाग:

      • नागरिक सक्षमीकरणासाठी ग्रामसभांचे सशक्तीकरण
      • सामाजिक लेखापरीक्षण, RTI, जनसुनावण्या
      • जलद व उत्तरदायी तक्रार निवारण प्रणाली