क्रुषी विभाग जिल्हा परिषद लातुर आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
 
श्री.एस.आर.चोले
क्रुषी विकास अधिकारी,जि.प.लातुर.

प्रस्तावना.

भारत हा कृषि प्रधान देश असून कृषि हा अर्थ व्यवस्थेचा आधारस्तंभ मानला जातो. देशाच्या स्थुल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा 13.7% आहे. भौमितिक पद्धतीने वाढणारी देशाची लोकसंख्या पाहता कृषि उत्पन्नामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, खते, औजारे, पीक संरक्षण औषधे इ. बाबी शेकर्यां"ना माफक दरात योग्यवेळी उपलब्ध होणे व त्यासाठी शेतकर्यांतमध्ये जाणीव-जागरुकता निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेऊन व बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे कृषि विभाग, जिल्हा परिषद,लातूर कार्यरत आहे. लातूर जिल्हयात एकुण 10 तालुक्यांचा समावेश असून जिल्हयाचे भौगोलिक ७.१५ लक्ष हे. क्षेत्रफळ आहे त्यापैकी लागवडी लायक क्षेत्र ६.६५ लक्ष हे.असून लातूर जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७३४.५५ मि,मि.आहे.

 
विभागाचा दुरध्वनी क्रमांक
02382 259233

विभागाचा ईमेल

adolatur@gmail.com
अ)पिक निहाय पिक क्षेत्र खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. पिकाचे नाव पिकाखालील क्षेत्र (लक्ष हे.) टक्के
1 तेलबिया २१७३५० 38%
2 तृणधान्य १४५६६० 26%
3 कडधान्य १४६०४० 26%
4 ऊस ४५०२० 08%
5 फळबाग १०९२७ 2% 
ब)हंगाम निहाय पिक क्षेत्र खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. हंगाम पिकाखालील क्षेत्र (लक्ष हे.)
1 खरीप ५.५६
2 रब्बी १.८८
3 उन्हाळी --

लातूर जिल्हयाच्या हवामान वैशिष्टयांचा विचार करता जिल्हयाचे सर्वसाधारण हवामान उष्ण असून हा जिल्हा अवर्षन प्रवण क्षेत्रात सामावेश आहे. जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७३४.५५ मिमि. असून जुन ते सप्टेंबर कालावधीमध्ये बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वार्यातपासून पडते. औसा तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे उर्वरीत तालुक्यात सर्वसामान्य असून जळकोट तालुक्याची डोंगरी तालुका म्हणुन गणला जातो.

कृषि विभागाकडील योजना अपारंपारिक ऊर्जा -

अपांरपारिक उर्जा स्त्रोत निर्माण करणे मानवाच्या विकास व उन्नती मध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. सद्यस्थितीमध्ये विज निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसा,तेल, नैसर्गिक वायु इ. पारंपारिक इंधन साठे दिवसे दिवस कमी होत चालले आहेत.उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णयानुसार नविन व नित्यनुतनशिल ऊर्जा साधनाचा(अपारंपारिक ऊर्जा) कार्यक्रम राबविणेचे दृष्टीने धोरण जाहीर केले. शासनाच्या धेारणाची अंमलबजावणी सन 2000 पासून जिल्हा परिषद,लातूर मार्फत करणेत येत आहे. तसेच सदर कार्यक्रमांतर्गत सौरपथदिवे,सौरकंदिल, उर्जा कार्यक्षम पथदिवे ग्रामपंचायतीने निवडलेल्या अभ्यासिके मध्ये सौर घरगुती दिवे बसविणे इ. योजना राबविणेत येत आहेत. त्याची दैनंदिन देखभाल हि ग्रामपंचायतीने करणे आवश्क आहे.सार्वजनिक ठिकाणी बसविणेत आलेल्या सौरपथदिवे व सौरघरगुती दिवे यांच्या देखभालीसाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांीवर जबाबदारी सोपविणेत यावी.

Not Found